पुरी (ओडिशा) – भगवान जगन्नाथाच्या जगप्रसिद्ध रथयात्रेला २७ जूनपासून भव्य सुरुवात झाली आहे. जगन्नाथ मंदिर हे केवळ स्थापत्यदृष्ट्या भव्य नसून, धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मंदिरातील एक खास गोष्ट म्हणजे भाविक मंदिराच्या तिसऱ्या पायरीवर कधीही पाय ठेवत नाहीत. यामागे श्रद्धा, परंपरा आणि गूढतेचा एक अनोखा संगम आहे.
तीसऱ्या पायरीबाबत श्रद्धेचं रहस्य
पुरीतील जगन्नाथ मंदिराच्या तिसऱ्या पायरीवर ‘अनंत वासुदेव’ म्हणजेच स्वयं भगवान विष्णूचं प्रतीकात्मक स्थान असल्याचं मानलं जातं. त्यामुळे त्या पायरीवर पाय ठेवणं म्हणजे थेट भगवंतावर पाय ठेवणं समजलं जातं.डॉ. भूषण ज्योतिर्विद यांच्या म्हणण्यानुसार, ही श्रद्धा फक्त अंधश्रद्धा नसून त्यामागे गहन आध्यात्मिक अर्थ आहे.
या परंपरेचा आध्यात्मिक अर्थ
विनयभाव आणि नम्रता – मंदिरात प्रवेश करताना अहंकार बाजूला ठेवून भगवंताप्रती नतमस्तक होण्याचा संकेत.
आध्यात्मिक जागृती – तिसरी पायरी टाळणं म्हणजे आपल्या मनात पवित्रता आणि श्रद्धा जागवणं.
ऊर्जेची शुद्धता – अशी मान्यता आहे की काही विशिष्ट जागा अत्यंत पवित्र आणि ऊर्जायुक्त असतात.
भाविक काय करतात?
काही भाविक तिसऱ्या पायरीवर नतमस्तक होतात व कपाळाला हात लावतात.
काही जण तिसरी पायरी टाळून दुसरी किंवा चौथी पायरी वापरून आत प्रवेश करतात.
ही पायरी ओलांडणं म्हणजे पाप होण्याची भीती असल्याने, भक्त आदरपूर्वक तिला वंदन करतात.
उपसंहार
पुरीचं जगन्नाथ मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर हजारो वर्षांची संस्कृती, श्रद्धा आणि आत्मिक जडणघडण असलेलं स्थान आहे. ‘तिसऱ्या पायरी’सारख्या परंपरा आपल्याला फक्त नियम नव्हे, तर आत्मिक अनुशासन आणि भगवंताप्रती नम्रता शिकवतात.