DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

देशात पुन्हा भाजपा प्रथम पक्ष : जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे

जळगाव | प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टी ही नेहमी संघटनेच्या जोरावर निवडणुका लढवीत असते आणि पूर्ण ताकदीने रणांगणात उतरत असते. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता यांना सोबत घेऊन निवडणुकीत जिंकत देखील असते. आज आलेल्या निवडणुकांच्या निकालानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर येथे पूर्ण बहुमतांनी जनतेच्या आशीर्वादाने सरकार बनवत आहे. त्याचबरोबर गोवा याठिकाणी सुद्धा भाजपचेच सरकार बसेल असा आम्हाला विश्वास आहे. हा विजय मा.पंतप्रधान मोदीसाहेबांचा सर्व समाजांच्या बांधवांना सोबत घेऊन पुढे जाण्याच्या हेतून आणि देश हिताच्या उद्देशांमुळे शक्य झालेला आहे. पंतप्रधान मोदी साहेब हे नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. या निकालावरून जनतेने घराणेशाहीला थारा न देता, मोदिजींच्या “सबका साथ, सबका विकास” या मंत्राला प्रचंड साथ दिली आहे.

 

भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत सर्व समाजाला सोबत घेऊन सर्वसाधारण, गोर गरीब मायबाप जनतेने आज त्यांचा कौल भाजपा कडे असल्याचे दर्शविले आहे. याच बरोबर आजच्या निकालाने भारतीय जनता पार्टी हा पुन्हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. हा विजय फक्त भारतीय जनता पार्टीचाच नाही तर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा, देशभरातील सर्व सामान्य जनतेचा विजय आहे. भारतीय जनता पार्टीवर जनतेने दाखविलेल्या या अफाट विश्वासासाठी सर्व जनतेचे मन:पूर्वक आभार.

 

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.