DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आदिवासी कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसल्याने लोक संघर्ष मोर्चाचे २६ जानेवारी पासून आमरण उपोषण


अमळनेर :- तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना वर्षभरापुर्वी शासकीय योजनेत मिळालेले रेशनकार्ड वेळोवेळी विनंती निवेदन देऊन हि आदिवासी कुटुंबांचे रेशनकार्ड आजतागायत Online हि केलेले नाहीत व अमळनेर तहसील कार्यालयाकडून दिनांक ३/६/२०२१ च्या पत्रानुसार पाठपुरावा करून हि आजपर्यंत एक हि कुटुंब अन्नसुरक्षा योजनेत घेतले नसल्याने व तालुक्यातील एका गावाची सप्टेंबर २०२१ मधे तहसीलदार साहेबांनी निर्गमित केलेली ६६ लाभार्थ्यांची अन्नसुरक्षा यादीतील ५६ ते ६६ क्रमांक वरिल ११ आदिवासी लाभार्थी वगळता इतर लाभार्थ्यांचे रेशनकार्ड Online करून अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देत आहेत, लोकसंघर्ष मोर्चा ने वेळोवेळी पाठपुरावा करून हि तालुक्यातील आदिवासी कुटूंबांना अन्नसुरक्षा योजनेत वंचित ठेवत असल्याने लोकसंघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २६ जानेवारी २०२२ पासून कोरोणा लसीचे दोन डोस घेतलेले, मास्क लावून, सामाजिक अंतर ठेवून, कोरोणा साथरोगाचे नियम पाळत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते आदिवासी रेशनकार्ड धारक कुटुंब न्याय मिळेपर्यंत अमळनेर येथे तहसील कचेरी समोर आमरण उपोषणास बसणार आहेत, त्याबाबतचे निवेदन मा. तहसीलदार साहेब अमळनेर व माहितीस्तव, मा.ना. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री सो, मा.ना. छगनरावजी भुजबळ साहेब, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, मा. के.सी. पाडवी साहेब, आदिवासी विकास मंत्री, मा.ना. गुलाबरावजी पाटील साहेब, पालकमंत्री जळगाव, मा.आ. दादासाहेब अनिल पाटील विधानसभा सदस्य अमळनेर, जिल्हाधिकारी सो जळगाव, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, जिल्हा पुरवठा अधिकारी सो जळगाव, प्रांताधिकारी सो अमळनेर, पोलीस निरीक्षक सो अमळनेर यांना दिनांक १०/१/२०२२ रोजी देण्यात आले असून सदर निवेदनावर लोकसंघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे सह मधुकर चव्हाण, रावसाहेब पवार, अविनाश पवार, बालीक पवार, विनायक सोनवणे, भिमसिंग पाडवी यांच्या स्वाक्षरी आहेत.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.