जळगावसह उत्तर महाराष्ट्र उष्णतेने होरपळला; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
जळगाव – राज्यात एप्रिलच्या अखेरीपासून वाढत असलेली उष्णतेची तीव्रता मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी वाढली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असल्याने हवामान विभागाने मंगळवारी काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. नंदुरबार, जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत उष्ण लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
