DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

लग्नाच्या आठवडाभर आधी तरुणाची आत्महत्या

जळगाव, वाकडी (ता. जळगाव): घरात लग्नाची तयारी, पाहुण्यांची ये-जा आणि आनंदाचे वातावरण… अशा काळात वधूवर होणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अमोल वाल्मीक पाटील या तरुणाने सोमवारी रात्री जेवणानंतर शेतात जाऊन गळफास घेतल्याचे मंगळवारी सकाळी उघड झाले. ही घटना वाकडी शिवारात घडली असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमोल याचे खामखेडा (ता. मुक्ताईनगर) येथील मुलीसोबत 21 मे रोजी विवाह ठरलेला होता. 20 मे रोजी हळद समारंभ होणार होता. घरात उत्साहाचे वातावरण असतानाच त्याने असा टोकाचा निर्णय का घेतला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या जाण्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.