DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव मनपाच्या निष्क्रियतेचा फटका; अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

छत्रपती शिवाजीनगर परिसरात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, मनपाच्या कारभारावर संताप

जळगाव | जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात आज दिनांक १८ रोजी झालेल्या पाणीपुरवठ्यात अतिशय अशुद्ध पाणीपुरवठा झाल्याने परिसरात नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे पुन्हा एकदा नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशुद्ध पाण्यामुळे आरोग्य धोक्यात, उपाययोजनेची मागणी
प्रभाग क्रमांक १ मधील दूध फेडरेशन रोड ते शिवाजीनगर परिसरात पाण्यात दुर्गंधीयुक्त व मळकट पाणी आले असून, यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पाण्यामुळे पोटदुखी, जुलाब, उलट्या यांसारखे संसर्गजन्य आजार फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्वरित उपाययोजना करून शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

मनपाचे दुर्लक्ष, अधिकाऱ्यांवर टीकेची झोड
या गंभीर समस्येची वारंवार तक्रार करूनही मनपा प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आहे. विकासकामांच्या दर्जाबाबतही नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची असून, मनपाचे अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत.

 

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.