DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रेल्वेच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : शतपावलीसाठी गेलेल्या अर्जुन भिवसन चौधरी (वय ८५, रा. चौघुले प्लॉट शनिपेठ) यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील शनिपेठमधील चौघुले प्लॉट परिसरात अर्जून चौधरी हे आपल्या पत्नी आणि चार मुलांसह वास्तव्याला होते. रोज पहाटे शतपावली करण्यासाठी जात होते. दरम्यान गुरुवार २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ते

 

नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर गेले होते. दरम्यान जळगाव ते भादली दरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक ४२१ – २ जवळ रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ वाजता उघडकीला आले. परिसरातील अर्जुन चौधरी यांची ओळख पटविली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना व नातेवंडे असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ परिष जाधव करीत आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.